75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : आपण ताकदीने मैदानात उतरु आपल्याला कुणी अडवू शकत नाही असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणूक निकाल लागून दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता वेध लागले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे. महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत जे भाषण केलं ते देखील याचीच प्रचिती देणारं होतं. महाराष्ट्रात आपल्याला नव्या दमाने मैदानात उतरण्याची गरज खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण एकजुटीने मैदानात उतरलो तर महायुतीचा भगवा रोवण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात जी लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात निराशा आली. कारण इतक्या कमी जागा येतील असं वाटलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा बनण्यासाठी कौल जनतेने दिला. त्याचवेळी महाराष्ट्रात आपण कमी पडलो याची खंतही आपल्याला आहे. महाराष्ट्रात पक्षात आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती. चार पक्षांशी होती, चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

आपले विरोधक इतके निर्ल्लज आहेत की..

आपल्या विरोधकांचं धोरण म्हणजे रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. रोज खोटं बोललं की ते लोकांना खरं वाटू लागतं. इतके निर्लज्ज लोक आहेत की त्यांना खोटं बोलल्याशिवाय सकाळचा नाश्ताही घशाखाली उतरत नाही आणि रात्रीचं जेवणही. फेक नरेटिव्हला आपण परिणामकारक रित्या उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की काही मतं कमी झाली असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

मला तीन महिने द्या, सत्ता आपलीच

पुढचे तीन महिने तुम्ही मला द्या, मी राज्यात तुम्हाला तुमची सत्ता देतो. ज्या कार्यकर्त्यांना जिंकण्याची उर्मी आहे ते तुमच्यासारखे कार्यकर्ते बरोबर आहेत. आपण पुन्हा जर पूर्ण ताकदीने जर मैदानात उतरलो तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादने पुन्हा एकदा तुमच्या मनातलं सरकार आणून दाखवेन. असं आश्वासन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कार्यकर्त्यांना दिलं.

विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र, सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तर माझा यांना सवाल आहे की, मागची ७० वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली. यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला शेतमजूर, गरीब का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात. कारण सत्तेवर आले की तात्काळ स्वतःची घरभरणं, आपल्या तिजोऱ्या भरणं, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे करत जनतेची लूट करणं, हेच यांना ठाऊक आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच यांचे सूत्र आहे आणि हीच त्यांची मानसिकता असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलीय

Devendra Fadnavis
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...